कंगनाशी 2 ‘हात’, शिवसेनेला मिळत नाही मित्रपक्षांचे ‘समर्थन’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबईमध्ये चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरोधात बीएमसीची कारवाई करणे हे शिवसेनेवर उलटा डाव पडल्यासारखे दिसत आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील भागीदार असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने या वादाबाबत हात झटकले आहेत. महाविकास आघाडी सरकारचे भागीदार असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पॉली हिल्समधील कंगनाच्या कार्यालयात बीएमसीच्या तोडफोडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवार यांनी त्यास बीएमसीचे अनावश्यक पाऊल म्हणून घोषित केले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हात झटकले

शरद पवार म्हणाले की, बीएमसीच्या या कारवाईमुळे अनावश्यकपणे कंगनाला बोलण्याची संधी मिळाली आहे. मुंबईत इतरही अनेक बेकायदा बांधकामे आहेत. अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पाहण्याची गरज आहे. ते म्हणाले की मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करतात हे सर्वांना ठाऊक आहे. आपण या लोकांना प्रोत्साहन देऊ नये. कॉंग्रेस नेते आचार्य प्रमोद म्हणाले की, ‘मुंबईला “पीओके” म्हणणे चुकीचे आहे, परंतु एखाद्या राजकीय वक्तव्याला विरोध म्हणून कोणाचे ‘घर’ तोडणे हे देखील चुकीचे आहे.’

त्याचवेळी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट केले की, ‘कंगनाचे कार्यालय बेकायदेशीर होते की त्यास पाडण्याचा मार्ग? कारण हायकोर्टाने ही कारवाई चुकीची मानली आणि त्वरित त्यास थांबविले. संपूर्ण कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली. पण सूड घेण्याच्या राजकारणाचे वय खूपच थोडे असते. कदाचित एका कार्यालयाच्या भानगडीत शिवसेनेचे डिमॉलिशन सुरू होऊ नये म्हणजे झालं.’

कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी कंगना रणौत यांच्याशी झालेल्या वादाचे अनावश्यक असे वर्णन केले असून प्राथमिकता निश्चित केली पाहिजे असे सांगितले. तथापि त्यांनी ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु ज्यावेळी त्यांनी हे ट्विट केले त्याचे थेट संबंध बीएमसीच्या कंगना रणौतच्या कार्यालयातील कारवाईशी जोडले जात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मिलिंद देवरा यांनी ट्विट केले की, राजधानीतील आर्थिक बाबींची परिस्थिती भयानक आहे. महाराष्ट्र कोविड -19 चा ग्राउंड झिरो बनलेला आहे. सुशासनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण राजकीय युक्तीत व्यस्त आहोत. सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्राधान्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि बीएमसीवर शिवसेनेचे नियंत्रण आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध बुधवारी तोडफोडीपर्यंत पोहोचले. कंगना मुंबईला पोहोचण्यापूर्वी बीएमसी त्यांच्या पॉली हिल्समधील कार्यालयावर जेसीबी घेऊन पोहोचले. बेकायदा बांधकाम केल्याच्या आरोपावरून महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा एक भाग पाडला.