पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तीने मला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप केला आहे.
कंगना म्हणाली की, गेल्या 10-15 दिवसांपासून मला ऑनलाईन लिचिंगचा सामना करावा लागत आहे. पण या देशाला काही प्रश्न विचारणे हा माझाही हक्क आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व काही स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही शंकेला वाव नाही. असे असताना शेतकरी आंदोलन राजकीय प्रेरित आहे, हे अगदी स्पष्ट आहे. कुठेतरी आंदोलनात दहशतवाद्यांनीही भाग घेतला आहे. मला दहशतवादी देशात फूट पाडण्यांबद्दल तक्रार नाही. माझी खरी तक्रार तुमच्याबद्दल आहे. तुम्ही लोक इतक्या सहजपणे या लोकांच्या बोलण्याकडे कसे लक्ष देता, त्यांच्या इशा-यावर कसे नाचता? या दहशतवाद्यांसमोर स्वत: इतके दुबळे का ठरता? असा सवाल तिने या व्हिडीओतून केला आहे.
Here’s the video I promised, watch when you can 🙏 pic.twitter.com/0YZxfQfwB2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 19, 2020
माझ्यावरच संशय का?
मी काही बोलले की, माझ्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रियंका चोप्रा व दिलजीत दोसांज यांच्या मनसुब्यांवर असे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत ? मी राजकारण करत असल्याचा आरोप माझ्या होत आहे. हे काय करत आहेत, यांना का विचारले जात नाही? असेही कंगना म्हणाली.