… और फिरसे कंगनाको गुस्सा आया आमिर, आलियावर भडकली कंगना

मुंबई : वृत्तसंस्था – कंगनाची ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ७६.६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका कंगनाने साकारली आहे. आणि या भूमिकेमुळे तिचे कौतुकही होत आहे. या चित्रपटातुन कंगनाने दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केलं आहे. पण या चित्रपटावरून सुरु झालेला कंगना आणि डायरेक्टर क्रिश यांच्यातील वाद वाढत आहे. आणि आता हा वाद बॉलिवूड पर्यंत आला आहे.

नेहमी बेधडक वक्तव्य करणाऱ्या कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड सेलिब्रेटीवर निशाणा साधला आहे.आमिर खान,आलीय भट्ट आणि ट्विंकल खन्ना यांच्यावर कंगनाने आरोप केले आहे. संपूर्ण इंडस्ट्री माझ्याविरोधात एकत्र झालीय, असा आरोप तिने केला आहे. ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचे आणि तिच्या अभिनयाचं सगळी कडून कौतुक होत असताना यावर बॉलिवूडच्या एकही कलाकाराने तिच्या या यशावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नेमका याच गोष्टीचा कंगनाला राग आला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीने नेहमी माझ्याकडे दुर्लक्ष केल आहे. कोणी माझ्या मुव्ही ट्रायलमध्ये येतही नाही. पण जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा निर्लज होऊन मला फोन करतात आणि बोलवतात.आणि मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून त्यांच्या कार्यक्रमाला जाते. आता मी सुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जाणे सोडले आहे. आलियाने तर मला ‘राजी’ चित्रपटाचा ट्रेलर पाठवत, तो बघण्याची विनंती केली होती. हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलिया दोघींनाही स्वत:हून फोन केला. पण माझ्या चित्रपटाबद्दल मात्र कोणीही एक शब्द देखील बोललं नाही.

आमिरनेही मला ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ साठी फोन केला होता. आमिर खान व ट्विंकल खन्ना महिला सक्षमीकरणावर तासन् तास बोलतात. पण मणिकर्णिकासारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची एका ओळीचीही प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान करत आहे, असं यावेळी कंगना म्हणाली.