‘पंगा’ प्रदर्शित झाल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकणार अभिनेत्री कंगना रनौत ? ‘या’ कारणामुळे आहे चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील सर्व कलाकारांच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मग त्यांचे लग्न असो, अफेअर्स असो किंवा मग त्यांचा घटस्फोट असो. त्यांच्या कोणत्याही गोष्टी चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनतो. यावर्षी अनेक कलाकार लग्नाच्या बंधणात अडकणार आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनौतही सामील आहे. ती यावर्षी लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनसोबत तिचा ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप स्पष्टपणे बोलताना दिसली. ती म्हणाली की, ती आता सिंगल नाही. तिच्या या बोलण्यावरुन ती लग्नाच्या बंधनात अडकण्याचा अंदाज लावला जात आहे.

कंगना म्हणाली की, ‘एक कलाकार म्हणून, मला असे वाटते की, मनात एक स्वप्न घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. ते स्वप्न जे आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. ‘

कंगना म्हणाली, ‘मला माझे ते दिवस आठवत नाही जे मी प्रेमाशिवाय जगले. प्रेमाविषयी मला खूप वाईट अनुभव आले आहेत, परंतु न खचता मी खूप लवकर पुढे गेले. मी त्या व्यक्तीला किस करु शकले नाही. मग मी हातावर किस करण्याची प्रॅक्टिस केली. माझी पहिली किस बिलकुल मॅजिकल नव्हती. माझे तोंड फ्रिजसारखे झाले होते. काहीच हालचाल होत नव्हती. माझ्याकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. शेवटी त्यानेच मला सांगितले की, तोडांची काहीतरी हालचाल कर.’

एकेकाळी लग्नाच्याबाबतीत कंगना कंफर्टेबल नव्हती, परंतु नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘ अर्थातच मी नेहमीच म्हणाले आहे की, त्या व्यक्तीला शोधणे कठीण आहे जो आपल्या लेवलला असेल.’ नितेश तिवारीला भेटल्यानंतर मला समजले की लग्नाविषयी माझे मत बदलत आहे. तो आपल्या लाईफमध्ये खूप खूश आहे. तो आपल्या पत्नीला पुर्णपणे सपोर्ट करतो. मला वाटते की आता मी लग्नासाठी तयार आहे. ‘

कंगनाला विचारले गेले की, तु लग्न कधी करणार तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘लवकरच’ तिच्या या उत्तरानंतर असा अंदाज लावला जात आहे की तिचा आगामी चित्रपट ‘पंगा’ प्रदर्शित झाल्यानंतर लग्न करणार आहे ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/