कन्हैय्या कुमार बिहारमधून लढणार २०१९ ची लोकसभा निवडणूक!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांकरिता आतापासूनच सर्व पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. २०१९ ला कोणत्या पक्षातून कोणता उमेदवार उभा राहणार इथपासून ते कोणाची सत्ता येणार इथपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. जवाहरलाल नेहरु यूनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार देखील २०१९ च्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’309f328e-af3f-11e8-bb1f-b5635fa61927′]

कन्हैया कुमार आपल्या विवादात्मक भाषणांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे कन्हैय्याने जनमानसात  आपला एक विशिष्ट वर्ग तयार केला आहे. म्हणूनच  कन्हैय्या कुमार ने आपल्याच पक्षांमधून निवडणूक लढवावी याकरिता बिहार मधील पक्षांमध्ये चढाओढ सुरु होती . मात्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणूक कन्हैय्या कुमार  लढणार आहे. महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्या कुमारला बिहारमधील बेगूसराय या मतदारसंघात मदत करणार आहेत.

कन्हैय्या कुमारने २०१९ ची लोकसभा निवडणूक बेगूसराय मतदारसंघातून लढावी, अशी डाव्या पक्षांची इच्छा असल्याचे  सीपीआयचे राज्य सचिव सत्यनारायण सिंह यांनी सांगितले. काँग्रेस आणि आरजेडीसह इतर पक्षांचाही कन्हैय्या कुमारला पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

जाहीरात

सीपीआयने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये सहा जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय इतर मित्र पक्षांशी चर्चा करुन घेतला जाईल. ज्या सहा जागांवर उमेदवार देण्याची इच्छा आहे, त्यामध्ये बेगूसराय, मधुबनी, मोतीहारी, खगरिया, गया आणि बांका यांचा समावेश आहे, अशी माहिती सत्यनारायण सिंह यांनी दिली.
दरम्यान, कन्हैय्या कुमारही लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं. महाआघाडीतील घटक पक्ष आरजेडी, काँग्रेस, डावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कन्हैय्या कुमारला समर्थन असेल, असंही त्यांनी सांगितलं.

कन्हैय्या बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील  बरौनी प्रखंड अंतर्गत बिहट पंचायत क्षेत्रातील रहिवासी आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका, तर वडील शेतकरी आहेत. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेगूसरायमध्ये सध्या भाजपचे वरिष्ठ नेते भोला सिंह खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीचे उमेदवार तनवीर हसन दुसऱ्या आणि सीपीआयचे राजेंद्र प्रसाद सिंह जेडीयूच्या समर्थनाने तिसऱ्या क्रमांकावर होते.

जन आशिर्वाद रॅलीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक

जाहीरात