जेव्हा ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर हृतिकसोबत बोलत नव्हता ‘किंग’ खान, ‘बिग बी’ आणि ‘काजोल’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   करण जोहरच्या डायरेक्शनमध्ये बनलेला दुसरा सिनेमा कभी खुशी कभी गम भलेही कौटुंबिक प्रेम आणि वातावरणावर भाष्य करणारा असो परंतु सेटवरील वातावरण अजिबात कौटुंबिक आणि प्रेमाचं नव्हतं. हृतिकसाठी तर अजिबातच वातावरण चांगलं नव्हतं. करण जोहरनं त्याचं पुस्तक एन अनसुटेबल बॉय मध्ये खुलासा केला आहे की, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि काजोल हृतिकपासून अंतर ठेवून वागत असे. त्यालाही वाईट वाटायचं कहो ना प्यार है या हृतिकच्या सिनेमाच्या यशामुळं हे सगळं सुरू होतं.

कहो ना प्यार है सिनेमाच्या यशानंतर हृतिकची तुलना शाहरुख खानसोबत होऊ लागली. हृतिक मोठी व्यक्ती बनला होता. करणनं पुस्तकात लिहिलं की, हे खूप चुकीचं होतं कारण हृतिक ज्युनियर आर्टीस्ट होता आणि शाहरुख आधीच मोठा स्टार होता. परंतु त्याच काळात शाहरुखचे एक दोन सिनेमे फ्लॉप झाले. यानंतर मीडियानं हृतिकला प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. यातून जे झालं ते खूप वाईट झालं.

हृतिकसोबत बोलत नव्हते शाहरुख, अमिताभ आणि काजोल

करण पुढे लिहितो की, शुटींग दरम्यान हृतिकला कोणाची तरी गरज होती. कारण अमिताभ आणि जया बच्चन त्याच्यासोबत बोलत नव्हते. शाहरुखनंही त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती. काजोल तर आधीपासूनच शाहरुखची साथी होती. मला असं वाटलं की, मी हृतिकचा हात पकडायला हवा. नंतर मग आमच्यात चांगली मैत्री झाली होती.