‘बेबो’ करीनानं शाहिद कपूरसोबतच्या ब्रेकअपवर 13 वर्षांनंतर सोडलं ‘मौन’, सांगितलं ‘कारण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री करीना कपूर खान आणि शाहिद कपूर बी टाऊनमधील सर्वात चर्चित कपल राहिले आहेत. दोघांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही समोर येत होत्या. परंतु अचानक कोणाला काहीही न सांगता दोघे वेगळे झाले. या कपलच्या ब्रेकअपनंतर आता तब्बल 13 वर्षांनंतर करीनानं ब्रेकअपचा खुलासा केला आहे.

इम्तिजाय अलीनं डायरेक्ट केलेल्या जब वी मेट या सुपरहिट सिनेमांनतर करीना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं. यानंतर करीनानं सैफ अली खानसोबत लग्न केलं. आता अनेक वर्षांनंतर आता करीनानं यावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

करीना म्हणाली, “नशीबाचे काही आपले आपले प्लान असतात. आयुष्य त्याच्याच हिशोबानं चालतं. जब वी मेटच्या शुटींगपासून तर फिल्म टशनच्या शुटींगपर्यंत असं बरंच काही घडलं त्यानंतर आम्ही वेगळं झालो.”

जब वी मेट सिनेमात करीनाचं नाव गीत होतं गीतचं उदाहरण देत करीना म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यात आणि गीतच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एकसारख्या होत्या. त्यावेळी मला पर्सनली आणि प्रोफेशनली असं दोन्ही हँडल करणं अवघड होत होतं. जसं गीतचं आयुष्य सेकंड हाफमध्ये बदलतं तसंच माझ्या आयुष्यातही सिनेमा बनवताना होत होतं.”

करीना म्हणाली, “टशन सिनेमादरम्यान माझ्या रोल आणि माझ्या फिगरला घेऊन मी खूप उत्साहीत होते. टशननं माझं आयुष्य बदललं. कारण या सिनेमात मी माझ्या लाईफ पार्टनरला भेटले होते.”

करीना आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. 2016 मध्ये करीनानं तैमूरला जन्म दिला. 2015 साली शाहिद कपूरनं मीराराजपूत सोबत लग्न केलं. दोघांना आता मिशा नावाची एक मुलगी आणि झैन नावाचा एक मुलगा आहे.