काँग्रेसने आम्हाला सन्मानाची वर्तणूक दिली पाहिजे. काँग्रेसने आमच्या सोबत तृतीय नागरिका प्रमाणे व्यवहार करू नये. वाटाघाटी करून आपल्यातील मतभेद दूर करून आपण देवाण घेवाणीचे धोरण स्वीकारले पाहिजे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी म्हणले आहे. कर्नाटकातील जागा वाटपावरून सध्या दोन्ही पक्षात शीतयुद्ध सुरु आहे. कर्नाटकातील २८ लोकसभेच्या जागांपैकी १२ जागा आमच्या पक्षाला द्यावा अशी मागणी जनता दलाने केली आहे. तर काँग्रेसने या मागणीला अवास्तविक असल्याचे म्हणले आहे. तर २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने १७ जागी ,काँग्रेसने ९ जागी, तर जनता दलाने दोन जागी विजय मिळवला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना १२ जागा मागणे व्यवहारी आहे असे काँग्रेसचे मत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल आघाडीचे घोडे आघाडीत नाहणार का असे सर्वत्र विचारले जात आहे तर भाजप त्यांच्या भांडणाचा फायदा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तूर्तास भाजपने १६ तारखेला काँग्रेस-जनता दल आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला आहे.म्हणून १६ जानेवारीचा दिवस कर्नाटकाच्या राजकारणात काय घेऊन येतो हे बघण्यासारखे राहणार आहे.