तिथल्या नागरिकांनी, तरुण वर्गाने दहशतीच्या वातावरणात जगू नये असे काँग्रेसलाही वाटत नाही आणि भाजपालाही वाटत नाही अशीही टीका ओवेसी यांनी केली. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले पाहिजेत मात्र त्याचा अभावच आहे असेही मत ओवेसी यांनी मांडले. काश्मीर प्रश्न हा जेम्स बॉन्ड किंवा रॅम्बो सिनेमातील धोरणांप्रमाणे सोडवावा असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
काश्मीर हा भारताचा भाग असल्यामुळे पाकिस्तानला नाक खुपसण्याची मुळीच आवश्यकता नाही असे ओवेसी यांनी म्हटले आहे. अशात एनडीए सरकारने काश्मीरी पंडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले? असाही प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. यासाठी त्यांनी केंद्राच्याच अहवालाचा दाखला दिला. काश्मीर प्रश्न सोडवण्यात कुणालाही रस नाही तो भिजत ठेवण्यातच जास्त रस आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही मतं मांडली.