‘फरार’ आहे गुरू ! नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरूद्ध जारी केलं जाऊ शकतं अटक ‘वॉरंट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू बिहार पोलिसांसमोर हजर होत नाहीये, अशा परिस्थितीत पोलिस कडक पावले उचलू शकतात. असे सांगितले जात आहे की, कटिहार येथून अमृतसर येथे गेलेल्या जिल्हा पोलिसांसमोर जर ते 26 जूनपर्यंत हजर झाले नाहीत आणि जामीन पत्रावर सही केली नाही, तर पोलिस त्याच्याविरूद्ध अटक वॉरंटसाठी अर्ज करू शकतात. कटिहारचे एसपी अधीक्षक विकास कुमार यांच्या माहितीनुसार तपास अधिकारी जनार्दन राम आणि जावेद आलम यांना त्याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमृतसरला पाठवण्यात आले आहे, परंतु सिद्धू यांनी नोटीस रिसिव्ह केली नाही. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी नोटीस चिकटविली आहे.

कटिहर पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी नोटीस रिसिव्ह केली नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाऊ शकते. एसपी विकास कुमार यांनी माहिती देताना म्हंटले कि, 26 जूनपर्यंत हे दोन्ही पोलिस अधिकारी तिथेच राहतील आणि नोटीस रिसीव्ह करून घेण्यासाठी प्रयत्न करतील. जर त्यांनी नोटीस घेतली नाही आणि जामिनावरील बाँडवर सही केली नाही तर तपासाच्या आधारे कोर्टाकडून अटकेसाठी खटला चालवला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, जर कोर्टाला हवे असेल तर कुर्की प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकते.

कारसिहारच्या बारसोई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, कटिहार येथील बारसोई पोलिस स्टेशन घोटाळा क्रमांक 93/ 19 मधील आरोपी नवजोतसिंग सिद्धू फरार आहे. सिद्धू यांच्यावर 16 एप्रिल 2019 रोजी कॉंग्रेसचे उमेदवार सिद्धूविरोधात कटिहारच्या बारसोई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त विधान
एसपी म्हणाले की, नवजोतसिंग सिद्धू यांनी कटिहारमध्ये प्रचारादरम्यान बलरामपूर विधानसभेत वादग्रस्त भाषण केले. यावेळी त्यांनी संबोधित करतांना मुस्लिम मतदारांना म्हंटले होते कि, ‘आपण(मुस्लिम समुदाय) येथे अल्पसंख्यांक असूनही बहुसंख्य आहात. आपण एकता दर्शविली तर कोणीही आपला उमेदवार तारिक अन्वर यांना हरवू शकत नाही. भाषणादरम्यान सिद्धू म्हणाले, तुमची लोकसंख्या इथे 64 टक्के आहे. इथले मुसलमान आमची पगडी आहे. तुम्हाला काही अडचण असेल, तर मला लक्षात ठेवा. मी पंजाबमध्येही तुमचे समर्थन करीन. विरोधकांवर निशाणा साधत सिद्धू म्हणाले, ‘हे लोक तुम्हाला विभागत आहेत. मुस्लिमांना विभागात आहे. ओवेसीसारख्या लोकांना आणत ते मतांचे विभाजन करून जिंकू इच्छित आहेत. यासह ते म्हणाले, ‘जर तुम्ही 64 टक्के एकत्र आलात तर सर्व चित्र पालटेल आणि मोदींचा पराभव होईल. या निवडणूकीला असा सिक्सर मारा कि, मोदी बाउंड्री पलीकडे जातील. सिद्धू यांच्या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला होता आणि बारसोई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.