नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपने सुरु केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या अभियानावरुन आज टीका केली आहे. आपल्या मुलांना जर ‘चौकीदार’ बनावायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करावे, असे ट्विटरवरुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
केजरीवाल यांनी ट्विट करुन म्हटले आहे, मोदी संपूर्ण देशाला ‘चौकीदार’ बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर तुम्हाला आपला मुलगा ‘चौकीदार’ व्हावा असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, आणि जर तुमच्या मुलाला डॉक्टर, इंजिनीअर किंवा वकील व्हावे असे वाटेत असेल तर आम आदमी पार्टीला मतदान केले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांना ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान राबवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी भ्रष्ट्राचार आणि समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्धच्या लढाईत मि एकटा नसून संपूर्ण देश यामध्ये सहभागी आहे. यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार लावले आहे.
मोदी जी पूरे देश को चोकीदार बनाना चाहते हैं।
अगर आप भी अपने बच्चों को चोकीदार बनाना चाहते हैं तो मोदी जी को वोट दें।
पर अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा देकर डाक्टर, इंजीनियर, वक़ील बनाना चाहते हैं तो पढ़े लिखे ईमानदार लोगों की पार्टी आम आदमी पार्टी को वोट दें
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 20, 2019