दरम्यान, केजरीवालांवरील आरोप निराधार असून ते त्यांच्या आयआयटीमधील मित्राच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले असल्याचे स्पष्टीकरण आपचे नेते राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. भाजपचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी ट्विटरवरुन केजरीवालांच्या दुबई दौऱ्यावरून प्रश्न विचारला आहे. पक्षाच्या राजकीय मदतनिधीच्या नावाने ते काळा पैसा पांढरा करत आहेत. दिल्लीकरांचा पैसा ते इतर राज्यात आपचा प्रभाव वाढवण्यासाठी वापरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. नुकतेच दिल्लीचे आरोग्यमंत्री कोणालाही थांगपत्ता न लागू देता आठवडाभरासाठी दुबईला जाऊन आले.
हा सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचेही ते म्हणाले. भाजप आमदार व दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विरेंद्र गुप्ता यांनीही तिवारींच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. ८ नोव्हेंबरला केजरीवाल एअर इंडियाच्या विमानाने दुबईला जातात व आप ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करते. या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आपचे नेते राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.