खुशखबर ! UP मध्ये ‘DL’ परत गेल्यास 4 महिने वाट पाहण्याची नाही गरज, महाराष्ट्रात कधी ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचा वाहन परवाना जर पोस्टमनने एखाद्या कारणाने परत पाठवले तर घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण तुम्हाला आता 3 ते 4 महिने वाट पाहावी लागणार नाही. तुमचा वाहन परवाना परत पाठवण्यात आल्यास तो तुम्हाला लवकरच परत मिळेल. यासाठीचे केंद्र गाजियाबाद रिजनल कार्यालय, आरटीओ असेल.
त्यामुळे पोस्टमन वाहन परवाना लखनऊला परत पाठवून देतो. त्यामुळे लोकांना आणखी 3 ते 4 महिने वाट पहावी लागते. त्यामुळे लोकांना आरटीओ कार्यालयात चक्कर मारावी लागते. लोकांकडे थेट वाहन परवाना पोहचत नाही.
शासनाला प्रस्ताव पोहचला आहे, लवकरच मंजूरी मिळेल. यानंतर नोएडा, बुलंदशहर, हापुड आणि गाजियाबादमधील लोकांच्या समस्येचे समाधान होईल, लोकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागणार नाही.
महाराष्ट्रात ही सोय असावी
राज्यातील शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आरटीओ कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवाना पोस्टाने पाठविण्यात येतो. मात्र, काही कारणास्तव घरी कोणी नसल्यास किंबहूना पोस्टमनला पत्ता नाही सापडल्यास तो वाहन परवाना परत आरटीओ कार्यालयात जातो. त्यानंतर अनेक दिवस वाहन परवाना मिळण्यासाठी वाट पहावी लागते. उत्तरप्रदेशात आता 4 महिने वाट पाहण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे धोरण सरकारने अवलंबावे अशी मागणी यापुर्वी वेळावेळी करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे