Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya On Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून अनेक चर्चा सध्या राजकीय घडामोडीत होताना दिसत आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections) पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. आधीच राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. यांतर आता भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya On Uddhav Thackeray)

 

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मला हेच समजत नाहीये की काय चाललंय? औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, “ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आला आहे, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय.”

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, “महाराष्ट्रात आम्ही फिरतो तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की स्वत:च्या आमदारांना बिकाऊ म्हणणारा हे मुख्यमंत्री? आमदारांना अँटिचेंबरमध्ये काय सांगत असतील, सौदेबाजी चालू असेल माहिती नाही. हे काय होतंय ठाकरे साहेब?” असा घणाघात सोमय्यांनी केला आहे.

 

Web Title :- bjp leader kirit somaiya targets cm uddhav thackeray aurangabad visit rajyasabha election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा