‘फ्री’मध्ये बनवा किसान क्रेडिट कार्ड ! मोदी सरकारनं बंद केली ‘फीस’, फक्त 4 % दराने 3 लाखाचं कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शेती- शेतकऱ्यांसाठी केवळ ४ टक्के दराने पैसे देण्यासाठी जे किसान कार्ड बनविले जाते, त्याला बनविण्यासाठी लागणारी सर्व प्रोसेसिंग फी, इंस्पेक्शन आणि लेजर फोलियो शुल्क रद्द केले आहे. जर एखादी बँक अद्याप शेतकर्‍याकडून हा शुल्क वसूल करते तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या कार्डच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तसेच पूर्वी १ लाखांचे कर्ज गॅरंटीशिवाय दिले जात होते, जे आता १.६० लाख रुपये केले गेले आहे.

जाणून घेऊया किसान क्रेडिट कार्डबद्दल :
(१) आपल्याकडे शेतीसाठी जमीन असल्यास आपण आपली जमीन तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. त्याची मर्यादा एक लाख रुपये होती. पण आता आरबीआयने हमी नसलेल्या कृषी कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपये केली आहे.

(२) पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनातील शेतकर्‍यांना देखील आता केसीसीच्या माध्यमातून दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या मर्यादेपर्यंत ४ टक्के व्याज दराने लाभ मिळणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना सावकारांकडून मुक्ती मिळेल.

(३) सध्या देशात ७,०२,९३,०७५ शेतक्यांकडे केसीसी आहे. केसीसी अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने बँकांच्या मदतीने शेतकऱ्यांचा केसीसी बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्याअंतर्गत अर्ज सुलभ केला गेला आहे आणि फॉर्म मिळलेल्या दिवसाच्या १४ दिवसांच्या आत केसीसी जारी करण्याच्या आदेशाचा समाविष्ट केला आहे.

4 टक्के दराने कृषी कर्ज कसे मिळवावे :
दरम्यान, शेतीचे व्याज दर ९ टक्के आहे. पण त्यात सरकार २ टक्के अनुदान देते. अशा प्रकारे ते ७ टक्के करते. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला ३ टक्के अधिक सूट मिळते. अशा प्रकारे त्याचा दर प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी फक्त ४ टक्के आहे. कोणताही सावकार इतक्या स्वस्त दरावर कर्ज देऊ शकत नाही. अश्या परिस्थिती तुम्हाला कर्ज हवे असल्यास बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड बनवून शकता. त्याअंतर्गत तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.