14 कोटी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 6000 रूपयांच्या PM-Kisan सन्मान निधीसह आता मिळणार लाखो रूपयांचे 3 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता इतर फायदे देण्याची तयारी देखील सुरु केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी 15 दिवसाचे विशेष अभियान सुरु करण्यात आले आहे. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल. याद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पीकांसाठी दिले जाईल. हे कर्ज 7 टक्के दराने मिळेल. जे योग्य कालावधीत परत केले तर व्याजात 3 टक्के सूट दिली जाईल. अशा प्रकारे या कार्डद्वारे घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

हे अभियान 10 जानेवारी 2020 पासून सुरु होईल. या संबंधित निर्देश सर्व राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि सर्व बँकांच्या प्रबंध निदेशकांना आणि नाबार्डचे अध्यक्षांना जारी केले आहे ज्यात केसीसी अंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांना कवर करण्यासाठी विस्तृत विवरण दिले आहे. तसेच केसीसी न झालेल्यांच्या नावाची यादी तयार करण्यास सांगितले आहे.

सर्व लाभार्थ्यांना राज्य, केंद्र शासित प्रदेशाचे कृषि, पशुपालन, पंचायत आणि ग्रामीण विकास विभागासहित संबंधित विभाग आणि पंचायत सचिवांच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. एनआरएलएम योजनेंतर्गत बँक सखीचा उपयोग पीएम किसान लाभार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी केला जाईल जेणे करुन ते या उद्देशाने संबंधित बँक शाखांमध्ये जातील.

योजनेच्या लाभार्थ्यांना तीन खास सुविधा –
1. 6000 रुपये वर्षाला
2. किसान क्रेडिट कार्ड बनवून देणे.
3. सुरक्षा विमा योजनेचा फायदा शेतकरी सहज घेऊ शकतील. या योजनेतंर्गत 12 आणि 330 रुपयात 2 लाख रुपयांचा अपघाती आणि जीवन विमा मिळेल.

शेतकऱ्यांना पुढील 15 दिवसात मिळणार खास सुविधा –
ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांचे कर्जाचे लिमिट वाढवण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे कार्ड निष्क्रिय आहे, ते आपल्या बँक शाखेत जाऊन अक्टिव्ह करु शकतात. ज्या शेतकऱ्यांकडे ही सुविधा नाही, ते शेतकरी आपल्या जमिनीचे दस्तावेज आणि पीकाची माहिती घेऊन बँक शाखेत जाऊन नवे कार्ड तयार करुन घेऊ शकतात.

केसीसीसोबत आता व्याज दरातील सुविधा पशुपालन आणि मत्स्य पालनासाठी देखील निश्चित केले गेले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारने विनंती केली आहे की त्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करावे आणि त्यांच्यासाठी अतिरिक्त केसीसी जारी करण्याची परवानगी देतील.

अर्ज केला सोपा –
1. एका पानाचा एक सोपा अर्ज तयार केला गेला आहे की शेतकऱ्यांकडून बँकेच्या रेकॉर्डमध्ये मूळ डाटा प्राप्त केला जाईल आणि फक्त पीकाच्या पेरणीचे विवरणासह जमीन रेकॉर्डची एक प्रतिलिपी भरावी लागेल.
2. हा अर्ज सर्व वर्तमान पत्रात देण्यात येईल. लाभार्थ्यांनी या अर्जाचे कात्रण भरावे.
3. हा अर्ज www.agricoop.gov.in आणि www.pmkisan.gov.in पोर्टलवरुन डाऊनलोड करता येईल.
4. कॉमन सर्विस सेंटरमध्ये देखील हा अर्ज भरणे आणि संबंधित बँक शाखेत पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे.

सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहे की हे अर्ज जमा करुन घेण्याची व्यवस्था करावी, आणि अर्ज केल्याच्या तारखेनंतर 14 दिवसांच्या आता नवे केसीसी देणे किंवा सध्याच्या केसीसीची मर्यादा वाढवणे किंवा बंद केसीसी पुन्हा सुरु करणे हे सुनिश्चित करावे लागेल. याची देखरेख राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून केली जाईल. याचे काम डीडीएम, नाबार्डच्या संपूर्ण सहयोगात जिल्हा कलेक्टरद्वारे केले जाईल.

केसीसी शिवाय पीएम किसान लाभार्थी तसेच पात्र शेतकऱ्यांची सहमती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती योजनेसाठी नामांकित केले जाईल. या योजनेंतर्गत 2 लाखाचा विमा क्रमश 12 रुपये आणि 330 रुपयांच्या प्रिमियमने अपघात आणि जीवन विमा उपलब्ध केला जाईल.

किती कर्ज वाटणार मोदी सरकार –
मोदी सरकारचा दावा आहे की लागोपाठ तीन वर्षांपासून शेतकीकर्ज लक्ष्यापेक्षा जास्त देण्यात येत आहे. यासाठी 2020 – 2021 त्या अर्थसंकल्पात सरकारने हे वाढवून 15 लाख कोटी रुपये केले आहे. सरकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये. त्यांनी सरकारी संस्थांकडून कर्ज घ्यावे.