दररोज 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं का ?, जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकवेळा आपणास दररोज ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे बॉडी हायड्रेट होते आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांचाही सामना करावा लागत नाही. मात्र, खरेच आपल्याला दिवसात आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे का? तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.

८ ग्लास पाण्याची थेअरी कोणी सांगितली?

अमेरिकेत १९४५ साली फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड द्वारे नागरिकांना दररोज जवळपास २.५ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात होता. याच गोष्टीचे अनुसरण सर्वजण आजपर्यंत करत आहेत. फक्त यूएस नाहीतर संपूर्ण जगभरात याचे अनुसरण केले जात आहे.

याकडे झालं दुर्लक्ष

अनेक नागिरकांना ही गोष्ट माहिती नसेल की, या लोकप्रिय आयडियासोबत आणखी एक गोष्ट हायलाइट करण्यात आलेली. ती म्हणजे, व्यक्तीला २.५ लिक्विड इंटक घेणं आवश्यक आहे. पण आपल्या डाएटमध्ये सर्वात जास्त भाग हा भाज्या, ज्यूस, फळ यांचा असतो.

इतके पाणी पिणे ठरेल योग्य…

एखाद्या व्यक्तीने दररोज किती पाणी पिणं योग्य ठरते, हे त्याची लाइफस्टाइल, फूड हॅबिट्स इत्यादिंवर अवलंबून राहत. त्यानुसार, पाण्याचा इनटेक कमी जास्त करणे आवश्यक असते.

एक्सरसाइज

अनेक जण जास्त वर्कआउट किंवा एक्सरसाइज करतात. दररोज त्यांना २.५ लिट पाणी पुरेस नसते. कारण अ‍ॅक्टिव्हिटीमुळे जास्त घाम येतो आणि शरीराची हायड्रेशन लेव्हल कमी होते. म्हणून एक्सरसाइज न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त पाणी पिणे आवश्यक असते.

उष्ण आणि दमट वातावरणात राहणाऱ्या व्यक्ती

या वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींना दररोज ८ ग्लास पाणी पिणे पुरेसं नसते. कारण या वातावरणात त्यांचे शरीर वेगाने डिहायड्रेट होते. म्हणून त्यांना ज्यूस, साधं पाणी, फ्रुट्स इत्यादी पदार्थांच्या मदतीने जास्त लिक्विड इनटेक घेणं गरजेचं असते.

गरोदरपणा

महिलांना गरोदरपणात अन्य लोकांच्या तुलनेत लिक्विड इनटेक जास्त घेण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला डॉक्टर त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीनुसार देतात. तसेच गरोदरपणात किती पाणी प्यावे? याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असते.

आहारावर असते अवलंबून

तुम्ही जर हेल्दी डाएट फॉलो करत असाल, ज्यात फळं, ज्यूस आणि भाज्या मुबलक प्रमाणात असते. तर साध्या पाण्याचे ८ ग्लास तुमच्यासाठी आवश्यक नाही. कारण तुम्ही फॉलो करत असलेल्या डाएटमुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन येण्यास मदत होते.

(टिप : कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)