आजारापासून लांब राहण्यासाठी ‘या’ 11 भाज्यांचे नियमित सेवन करा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगला आहार घेणे हे देखील महत्त्वाचे आहे. कोरोना महामारीची साथ आणि त्यातच आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे सूर्यकिरणं प्रखर नसल्याने रोग होण्याची शक्यता अधिक असते. भूक न लागणे, सर्दी, पडसे, खोकला, ताप, आम्लपित्त, जुलाब, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार या काळात अधिक होण्याचा धोका असतो.

पावसाळ्यात मोजके आणि कमी खावे. पचायला हलका आहार घ्यावा. खाण्याचे पदार्थ स्वच्छ, ताजे व गरम असले पाहिजेत. आहारात मिरी, सुंठ, हिंग, आलं, लसूण, कांदा यासारख्या पदार्थांचे अधिक वापर करावा. फळभाज्या का खाव्यात, त्याचे उत्तर सुरुवातीच्या म्हणीत आहे. पावसाळ्यात कोणत्या फळ व पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते ते सांगण्यात आले आहे.

आपण जो दररोजचा आहार घेत असतो, त्या आहारातून आपल्याला शारीरास आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळत असतात. त्यातून आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होत असते. आजच्या धकाधकीच्या जिवनात रोगप्रतिकारकशक्ती चांगली टिकवण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. मानवी शरीरासाठी दैनंदिन आहारातून प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. आपले शरीर प्रथिने साठवून ठेवत नसल्याने रोजच्या आहारात प्रथिने घेणे आवश्यक आहे. सर्व पालेभाज्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करत असतात. जाणून घेऊयात आयुर्वेदानुसार भाज्यांचे गुणधर्म.

1. मेथी – वात व कफ दोषनाषक आहे. भुकेची इच्छा न होणे, मधुमेह, आमवात, ताप, स्थैल्य, सूज, वारंवार जुलाब होणे यात मेथीचा उपयोग होतो. मेथी आईचे दुध वाढवण्यास मदत करते त्यामुळे बाळंतपणात मेथी खावी.
2. वांगे – वांग्याविषयी खूपच मोठा गैरसमज आहे. तो म्हणजे वातुळ आहे. वास्तविक वांग्याने वातदोष वाढत नसून उलट दोषांचे शमन करते. पांढरे वांगे मूळव्याधनाशक आहे.
3.पालक – ही पालेभाजी पचायला जड असली तरी मलप्रवृत्ती साफ करणारी आहे. नेहमी खाण्यास योग्य आहे. रक्त वाढविणारी भाजी म्हणून पालक ही पालेभाजी प्रसिद्ध आहे. लोहाचे प्रमाण भरपूर असते.
4. चाकवत – ही वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. ही मूळव्याध, त्वचारोग, पोटाचे विकार यासाठी चांगली असून रक्त वाढविणारी आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
5. तांबडा भोपळा – शरीर बारीक असणे, लघवी साफ न होणे, सर्वांगाची आग होणे, त्वचाविकार यात उपयोगी ठरते. ज्यांना जाड व्हायचे आहे त्यांनी दोन्ही भोपळ्यांच्या भाज्या खाव्यात.
6. कांदा – सुका खोकला, रक्तपित्त, हृदय अशक्त असणे, लघवीला अडखळत होणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, संभोगाची इच्छा कमी होणे, मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे, संधिवात, कावीळ, सूज, मूळव्याध अशा अनेक आजारांवर कांदा गुणकारी आहे. जखमेवर याचा लेप करतात. जखम बरी होण्यास मदत होते. मुकामार लागून येणाऱ्या सुजेवर लेप करतात. फिट आली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात.
7. पडवळ – पचायला हलका, चवीला काहीसा कडू असून तिन्ही दोषकार आहे. अजिर्ण, वारंवार तहान लागणे, पोटात जंत होणे, सूज येणे, अशक्तपणा यावर पडवळ उपयोगी ठरते. याने शौचास साफ होण्यास मदत होते.
8. तोंडली – पचायला हलकी व दोषशामक आहे. याचा जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात. यकृतविकार, कावीळ, रक्तविकार, खोकला, दमा, मधुमेह या आजारांवर उपयोगी ठरते. मात्र हे नेहमी खाऊ नये.
9. दोडका – गाठी होणे, रक्त व त्वचारोग, प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे, खोकला व दमा या आजारांवर उपयोगी.
10. मुळा – कोवळा मुळा पचायला हलका असतो. मूतखडा असलेल्यांनी कोवळा मुळा आवश्य खावा. मासिकपाळीच्या वेळी योग्य प्रमाणात स्त्राव न होणे, यासाठी उपयोगी आहे. भाज्या फार बारीक चिरू नयेत.
11. कारले – पचायला हलके, चवीला कडू असून तिन्ही दोषांचे शमन करणारे आहे. हे जखमांची शुद्धी करणारे व जखमा भरून येण्यास मदत करणारे आहे. याचा यकृतविकार, स्वादुपिंडाचे आजार, आमदोष, मूळव्याध, त्वचाविकार, स्थैल्य, विषबाधा इत्यादी आजारांवर उपयोगी. मधुमेही रुग्णांवर विशेष उपयोगी आहे.