‘या’ पध्दतीनं चहाचं सेवन केल्यानं ‘डायरेक्ट’ निमंत्रण मिळतं आजारांना, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेय म्हणजे चहा. भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे धुके दाटलेले उदास उदास किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. पण तुम्हाला माहित असेल अनेक आजारांचं सगळ्यात मोठं कारण चहाचं अतिसेवन हे आहे. चहाचे जसे फायदे आहेत. तसेच शरीरासाठी नुकसानदायक सुद्धा चहाच आहे. आज आम्ही तुम्हाला चहाचे सेवन कशा पद्धतीने करु नयेत याबाबद्दल सांगणार आहोत..

१. सकाळी चहाच सेवन करण्याची सवय सगळ्यांनाच असते. पण सकाळी रिकाम्यापोटी चहा पिल्याने एसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते. भूक मरते, मोटाबोलिझमही मंदावत. त्यामुळे उठल्यानंतर आधी गरम पाण्याचे सेवन करा. म्हणजे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते. त्यानंतर नाष्ट्याला काही पौष्टिक पदार्थ खाल्यानंतर चहाचं सेवन करा.

२. रात्रभर शरीराला पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीर डिहायड्रेड झालेलं असते. अशावेळी तुम्ही चहा प्याल तर डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी रिकाम्या पोटी २ ग्लास पाणी प्या.

३. एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा चहा पित असाल, तर तुमची भूक मरते, कारण त्यात कॅफिने भरपूर प्रमाणात असते. शिवाय तुमची ऊर्जाही कमी होते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

४. चहा जास्त उकळून प्यायल्यानेही चहातील निकोटिनामाइडचं प्रमाण वाढतं, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

५. चहा सतत प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या सुद्धा उद्भवते. कारण दुधातील फॅट्स आणि साखर या पदार्थांचा आहारात जास्त समावेश असल्यामुळे वजन वाढू शकतं.

६. भरपूर वेळ आधी बनवलेला चहा तुम्ही पुन्हा गरम करून पित असाल, तर असा चहा विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे ताजा चहा प्या.

७. सतत चहा प्यायल्यामुळे दात खराब होतात. त्यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. म्हणून दिवसातून जास्त चहा पिणं टाळा.