अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल कन्फर्मेशन याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. हा खटला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात तीन जणांना फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. फाशीच्या शिक्षेची कन्फर्मेशन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या खटल्याची सुनावणी औरंगाबाद खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग केली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचन्द्र यादव पाटील हे काम पाहत आहे. या खटल्यात कन्फर्मेशन याचिकेवर सुनावणी होऊन त्यावर लवकर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय