टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडया आणि क्रृणाल पांडया यांच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळं निधन

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंआहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.

बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत. सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही.आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे.