Drugs News : मोठी कारवाई ! तब्बल 111 किलो चरस जप्त, संपुर्ण गाव ‘सीलबंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमधील कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. बंजारचे पोलीस उपाधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली बंजार पोलिसांनी बंजार येथील श्रीकोट पंचायतीमधील शिजाहू गावातून तब्ब्ल १११ किलो चरस जप्त आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने संपूर्ण शिजाहू गावच पोलिसांनी सील केलं आहे.

कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारस यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले पोलिस पथकाला या गावामध्ये एक चरस माफिया असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका पुरुषासहीत महिलेलाही अटक केली आहे.

याआधीही अशाप्रकारची बंजार पोलिसांनी कारवाई केली असली तरी यंदा सापडलेला साठा हा अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. गेल्या वर्षीही बंजार पोलिसांनी ४२ किलो चरस जप्त केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत आतापर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई केल्यानंतर या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपासही केला जात असून आतापर्यंत कुल्लू पोलिसांनी तीन कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मतदार यादीत मोठा घोळ ! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल १०२ मतदारांची नोंदणी
गेल्या अनेक वर्षांपासून मतदार याद्यांमधील घोळ काही मिटायचे नाव काही घेत नाही. अनेकांची नावं ही यादीतून गायब असतात. तर काही ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाची नोंद असते. आता हिमाचलमधून अशीच एक बातमी आहे. मात्र नुसता घोळ नाहीत तर चक्क एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल १०२ मतदारांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्ये येथे हा प्रकार घडला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर केले आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल १०२ मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.