लच्छू पहिलवानला अटक झाल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पाळला बंद

औरंगाबाद :वृत्तसंस्था

औरंगाबाद येथील मोती कारंजा परिसरात वाद होऊन दंगल झाल्याची घटना दि (११) मी रोजी घडली . या दंगलीप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. त्याच्या निषेधार्थ आज गुलमंडी ,धावणी मोहल्ला येथील व्यापाऱयांनी बंद पळाला आहे.

ही दंगल घडल्यानंतर पोलीस याबाबत तपास करीत असताना एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी दंगलीच्या मागे लच्छू पहिलवान यांच्यावर आरोप केला होता. या घटनेनंतर त्याचा या दंगलीशी काही संबंध आहे का, याविषयी पोलीस तपास करीत होते. दंगलीसोबतच तोडफोड आणि जाळपोळीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. शहरात झालेल्या दंगलप्रकरणी राजेंद्र जंजाळ, फेरोज खान या दोन नगरसेवकांच्या अटकेनंतर एसआयटीकडून ही मोठी कारवाई ठरली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ल्यात व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

चार दिवसांपासून एसआयटी

लच्छू पहिलवान विरोधात पुरावे गोळा करीत होते. दोन दिवसांपासून मात्र तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तो दिवाणदेवडी येथील त्याच्या एका मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. आयुक्तांच्या आदेशाने एसआयटीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, कर्मचारी मनोज उईके, दादासाहेब झारगड, सचिन संकपाळ, विनोद खरात आणि योगेश तळवंदे यांच्या पथकाने सापळा रचला. तो तेथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लच्छूला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. त्याला दंगल करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.