Lasalgaon : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने उसाचे मोठे नुकसान

लासलगाव – परतीच्या पावसाने निफाड तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने वेळापुर येथील मोतीराम भिकाजी पालवे यांचा 3 बिगे ऊस अवकाळी पावसाने आडवा पडून नुकसान झाले आहे. गुरुवारी झालेल्या जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टीने संपूर्ण ऊस हा भुईसपाट झालेला आहे. गुरुवारी पडलेल्या वादळी वाऱ्याचा पावसाने उभ्या असलेल्या उसाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे

परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तीन बिगे उभा ऊस आडवा झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.कोरणाच्या तडाख्याने शेतकरी पहिलेच हतबल असतांना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.परतीच्या पावसाने उसाचे मोठे नुकसन झाल्याने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.