Coronavirus : गेल्या 24 तासात पुन्हा आढळले ‘कोरोना’चे 94372 नवे पॉझिटिव्ह, देशात बाधितांची संख्या 47 लाखांच्या पुढं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आता कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या देशात 47 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासांचा अहवाल पाहता देशात कोरोनाचे 94 हजार 372 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 1114 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 47 लाख 54 हजार 356 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या ठीक होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. देशात सध्या कोरोनाची 9 लाख 73 हजार 175 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 37 लाख 2 हजार 595 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 78 हजार 586 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात देशात 10,71,702 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 5,62,60,928 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
India's #COVID19 case tally crosses 47 lakh mark with a spike of 94,372 new cases & 1,114 deaths reported in the last 24 hours.
The total case tally stands at 47,54,357 including 9,73,175 active cases, 37,02,596 cured/discharged/migrated & 78,586 deaths: Ministry of Health pic.twitter.com/rV5DC2mUZp
— ANI (@ANI) September 13, 2020
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 22,084 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची संख्या 10,37,765 वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या मते, संसर्गामुळे 391 रूग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 29,115 झाली आहे. ते म्हणाले की संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णालयामधून आज 13,489 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 7,28,512 झाली आहे. सध्या राज्यात 2,79,768 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
राजस्थानमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे
शनिवारी राजस्थानात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली, तर राज्यात या प्राणघातक विषाणूमुळे 1,221 लोक मरण पावले आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाची 1,669 नवीन प्रकरणे समोर आली असून राज्यात संक्रमित लोकांची संख्या 1,00,705 पर्यंत पोहोचली आहे, त्यापैकी 16,582 लोकांवर अद्याप उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत राजधानी जयपूरमध्ये 335 नवीन संक्रमित रुग्ण समोर आले. त्याशिवाय अजमेरमध्ये 101, अलवरमध्ये 109, जोधपूरमध्ये 280 आणि कोटामध्ये 152 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली. राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणखी 14 जण मृत्यूमुखी पडले असून, त्यामुळे कोविड-19 च्या कारणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढून 1221 झाली आहे.
हिमाचलमध्ये एका दिवसात सर्वाधिक 445 नवीन रुग्ण आले समोर
हिमाचल प्रदेशात शनिवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाला आणि त्यानंतर मृतांचा आकडा 72 वर पोहोचला. त्याच वेळी, एका दिवसात सर्वाधिक 445 नवीन रुग्ण समोर आले, त्यानंतर राज्यात संक्रमणाची एकूण संख्या 9,230 वर पोहोचली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) आर डी धीमान म्हणाले की, सध्या कोविड -19 च्या 3,194 रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की, राज्यात कोविड-19 चे 5,947 रुग्ण बरे झाले आहेत आणि 15 रुग्ण राज्याबाहेर गेले आहेत.
पंजाबमध्ये कोविड-19 चे 2,441 नवीन रुग्ण आढळले
शनिवारी पंजाबमध्ये कोविड-19 मुळे आणखी 76 लोकांच्या मृत्यूमुळे राज्यात मृतांची संख्या 2,288 पर्यंत वाढली आहे, तर कोरोना विषाणूचे 2,441 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 77,057 वर पोहोचली आहे. लुधियानामध्ये 14, अमृतसरमध्ये 11, जालंधरमध्ये 10, गुरदासपुरात सात, होशियारपूर आणि रूपनगरमध्ये प्रत्येकी पाच, बरनाला, पटियाला आणि कपूरथला येथे प्रत्येकी चार, फतेहगड साहिबमध्ये तीन, बठिंडा आणि संगरुर येथे प्रत्येकी दोन तर मुक्तसर, मोहाली, मोगा, पठाणकोट आणि तरण-तारण येथे प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.