मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस करण्यात आली आहे. याबाबत केंद्रात देखील एक बैठक झाली. कोणत्याही क्षणी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे राज्यात आता कोणाचीही सत्ता नाही हे जवळ जवळ निश्चित झालेले आहे.
Raj Bhavan Press Release 12.11.2019 3.16 PM pic.twitter.com/qmlQA6ghBR
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 12, 2019
सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाच नाही
शिवसेनेकडून काल सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचालींना सुरुवात झाली होती. त्यावेळी सेना सत्ता स्थापन करणार असेच सगळ्यांना वाटत होते मात्र काँग्रेसने ऐन वेळी संमत्ती पत्र न दिल्याने सेनेला सत्ता स्थापनेपासून वंचित रहावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले.
तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते.
Visit : Policenama.com
- ‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा
- गरोदर आहात ? सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय ? मग ‘हे’ 5 उपाय करा
- चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ ! नपुंसकतेमुळे अनेकजण त्रस्त
- वजन कमी करण्यासाठी काय करणार ? व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या