लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण, सियाचीन सीमेवरील घटना

निलंगा : पोलीसनामा ऑनलाईन –   सियाचीन सीमेवर गस्त घालताना अचानक वाहन खोल दरीत कोसळून निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील जवान नागनाथ अभंग लोभे (वय 35) यांना वीरमरण आले. रविवारी (दि. 20) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती रविवारी उशिरा मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नागनाथ लोभे इंडियन आर्मी इंजिनिअर 106 मध्ये कार्यरत होते. मागच्या अनेक वर्षापासून ते सियाचिन सीमेवर कर्तव्यावर होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी चार जवान एका वाहनातून सीमेवर गस्त घालत होते. त्यावेळी अचानक दरड कोसळून त्यांचे वाहन खोल दरीत कोसळले. त्यात चारही जवानांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गाव शोकसागरात बुडाला आहे. अंत्यविधीची तयारीसाठी ग्रामस्थ व प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मंगळवारी (दि. 22) दुपारनंतर अंत्यविधी केला जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जवान नागनाथ लोेभे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा परिवार आहे.