नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बारा जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. झारखंड मधील रांची शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून पीडितेची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत बाराही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
25 वर्षीय तरुणी लॉची विद्यार्थिनी होती. मंगळवारी कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत ती बसस्टॉपवर उभी होती. यावेळी तिची मैत्रीण देखील तिच्यासोबत होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञातांनी तिला बंदूक दाखवून तिचे अपहरण केले. शहरापासून दूर असलेल्या एका वीटभट्टीवर नेऊन बारा जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कारानंतर जर याबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकील असे देखील तिला धमकावण्यात आले. जखमी अवस्थेत तरुणी काही स्थानिकांच्या मदतीने कानके पोलीस स्टेशनमध्ये पोहचली आणि तिने या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने तरुणीची स्थिती यावेळी गंभीर असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत एक विशेष टीम यासाठी नेमली आणि बाराही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय