औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन
[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29dca9ac-ace7-11e8-becd-a18bbaca7ef7′]
मनसेच्या वतीने व्हिजन औरंगाबाद या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल विट्समध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शहरातील वकील महासंघ, आयएमए, सीए असोसिएशन, सीएमआयए, मसिआ, क्रेडाई आदी संघटनांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाशिक शहराचा मनसेने कसा विकास केला, याबाबत चित्रफित दाखवण्यात आली.
तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत राज ठाकरे म्हणाले, राज्यातून मुलींना पळवण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलींना कोठे नेले जाते, त्यांचे काय होते हे समोर आलेले नाही. ज्यांच्या मुली बेपत्ता आहेत त्यांचे कुटुंब आपल्या मुलीचे काय झाले असेल, या विचाराने टाहो फोडत आहेत. यास शासन दोषी आहे. मराठा आंदोलनादरम्यान औरंबादच्या वाळुज एमआयडीसीत घडलेल्या हिंसेबाबत राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी परिसरात कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामागे परप्रांतीय होते.