पाकिस्तान : रेल्वे-बस अपघातात 30 ठार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या सिंध प्रातांत रेल्वेची बसला धडक बसल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. बस रेल्वे फाटक पार करत असताना रेल्वेने बसला धडक दिली. ही घटना सुक्कुर जिल्ह्यातील रोहरी येथे घडली आहे. ही माहिती द एक्सप्रेस ट्रिब्यून ने दिली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेली बस ही कराची येथून सरगोधा येथे जात होती, त्यावेळी बसला पाकिस्तान एक्सप्रेसने धडक दिली.

या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुक्कुर चे आयुक्त शफिक अहमद यांनी दिली. हे वृत्त पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने दिले आहे. अपघातग्रस्तांना मदतीचे आणि बचावाचे आदेश आयुक्त महेसर यांनी दिले असून, सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.