जीव प्यारा असेल तर नोकरी सोडा

श्रीनगर : वृत्तसंस्था

काश्मीर खोऱ्यातील तरुण बेरोजगारीमुळे लष्कर, सुरक्षा दलातील नोकरी मिळविण्यासाठी गर्दी करीत आहे. त्यांना रोखण्यासाठी आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलात नोकरी करणाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना नोकरी सोडण्याची धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत. गेल्या तीन दिवसात अशा तीन घटना घडल्या आहेत.

[amazon_link asins=’B077HS273D’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’874b1e09-9541-11e8-b206-2925e5c8e6f0′]

दहशतवाद्यांनी सोमवारी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. नोकरी सोडली नाही तर जिवे मारण्यात येईल, अशी धमकी या दहशतवाद्यांनी त्याला दिली.

गेल्या तीन दिवसांत दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांवर केलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी शनिवारी पुलवामामधील त्राल परिसरात दहशतवाद्यांनी स्पेशल पोलिस अधिकारी मुदासीर अहमद लोन याचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. तसेच नोकरी सोडण्याची धमकी देऊन त्याला सोडले होते. लोन हा जम्मू काश्मीर पोलिस खात्यामध्ये आचाऱ्याचे काम करतो.

रविवारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील नैरा येथे सीआरपीएफ जवान नासीर अहमद यांची त्यांच्या घरी जाऊन हत्या केली होती. गेल्या काही काळात काश्मीर खोºयात पोलिस कर्मचाºयांचे अपहरण करून हत्या करण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर जवान आणि पोलिसांकडून हत्यार खेचणे हे नेहमीचेच झाले आहे.

या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ३९ सुरक्षा रक्षक, १७ सैनिक, २० पोलीस कर्मचारी आणि २ सीआरपीएफ जवानांची हत्या झाली आहे.