अमृतसर/पंजाब : वृत्तसंस्था – एकमेकांची साथ अगदी सात जन्मापर्यंत देऊ वगैरे शपथा घेतल्या जातात. मात्र, कधीकधी या शपथा सात जन्म तर सोडाच सात महिनेही टिकत नाहीत. असाच एक प्रकार अमृतसर येथे घडला आहे. नवविवाहीत दांपत्य देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिने प्रियकरासोबत पळून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीतचा 20 ऑक्टोबर रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर माझ्या मनाविरोधात लग्न झाल्याची माहिती पत्नीने पतिला सांगितली. देवदर्शनासाठी दोघे गेले होते. जोडीने दर्शन घेत असताना नवरदेवाने डोळे मिटल्यानंतर नवरीने तेथून पळ काढला. नवनीतने मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही बंद लागला. प्रियकरासोबतच ती पळून गेल्याची शंका पती नवनीतने वर्तवली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नवनीतने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आमचा विवाह झाल्यापासून पत्नी अजिबात खूष नव्हती. माझ्या मनाविरुद्ध लग्न झाल्याचे तिने मला सांगितले. मात्र, तिला समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी तिचे मन रमेल असे वाटले होते. तिला फिरवण्याबरोबरच देवदर्शनासाठी घेऊन गेलो असता ति पळून गेली. माझी काही चूक नसताना मला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे.
Visit : Policenama.com
- हृदयविकार आणि ‘कार्डिअॅक अॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे
- महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे
- ‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या
- रोज अंडे खाण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, जाणून घ्या
- महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे
- विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे
- ‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या