खातेवाटपानंतर आता चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराची, ‘या’ 21 दिग्गजांची वर्णी लागणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर इतक्या दिवस रखडलेल महाविकास आघाडी सरकारच खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नागपूरातच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे खातवाटप करण्यात आलं असून त्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. यात महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकासआघाडीचे स्थापन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. परंतु, सरकार स्थापन झाल्यावरही खातेवाटपाचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे सरकारचं खातेवाटप झालं. त्यात, शिवसेनेच्या वाट्याला गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मिळाली आहे. याचा कारभार एकनाथ शिंदे पाहणार आहेत. तसेच शिवसेनेचे सुभाष देसाई यांना उद्योग, उच्च तंत्र शिक्षण खात मिळालं आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय ही खाती असणार आहेत. तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य ही खाती आहेत. काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, तर बाळासाहेब थोरात हे महसूल, उर्जा खातं साभाळणार आहेत.

आता या खातेवाटपानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, त्यात तिन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे चर्चेत आहते. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांनाही संधी मिळणार आहे.

शिवसेना –
दिवाकर रावते, रामदास कदम, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, आणि दीपक केसरकर.

राष्ट्रवादी काँग्रेस –
जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.

काँग्रेस –
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, आणि सुनील केदार.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/