जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी आणि पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मागील काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्यांच्या तळांना टार्गेट करण्यात येत आहे. बुधवारी हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या जिवंत बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. महिन्याभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. जवानांचा ताफा श्रीनगरला जात असताना हा हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दशहशतवादी सघटनेने घेतील होती. याला प्रत्युत्तर देताना भारताने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांच्या तळावार हल्ला केला.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ १० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे दिसले होते. पाकिस्तानी दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले होते. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
Rajasthan: Live mortar bomb found near Nal-Bikaner Air Force Station, Indian Air Force officials present at the spot. pic.twitter.com/AZOhMcKva4
— ANI (@ANI) April 3, 2019