पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरामध्ये संचारबंदीपासून इतक्या मोठ्याप्रमाणात सवलती देण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे परिस्थिती बिघडू शकते. शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नागरिकांना बाहेर फिरण्यास परवानगी देण्याचा निर्णय योग्य नाही. यासंदर्भात आपण पालकमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.
पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. याला माझा विरोध आहे. पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत,अशी माझी भूमिका आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
पुण्यातील सर्व रस्त्यावर होणारी गर्दी चिंता वाढवणारी असल्याचे सांगत केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळ असाव्यात असे त्यांनी म्हटले आहे. नव्या आदेशानुसार सकाळी 10 ते 6 वेळ असल्याने लोक दिवसभर बाहेर असू शकतात. यावर नियंत्रण कसे आणणार ? असा सवाल महापौर मोहळ यांनी उपस्थित केला आहे. सव्वा महिन्यात पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. यासाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पुर्वीप्रमाणेच सुरु ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही स. १० ते दु. २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ७ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार?
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळल्याने आणि रुग्ण संख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश पुणे शहराला परवडणारे नाहीत. आज हजारो नागरीक रस्त्यावर आल्याने आपला उद्देश सफल ठरता दिसून येत नाही. दरम्यान महापौर मुरलीधर मोहळ यांनी आज उडालेल्या गोंधळावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दारुची दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकांनी सकाळी सात पासून गर्दी केली. अशा प्रकारचे निर्णय आठ दिवसांपूर्वी का घेतले नाहीत, असाही सवाल त्यांनी केला आहे.
पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे @PuneCityPolice यांच्यावर मोठा ताण येऊ शक्यता नाकारता येत नाही.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी मास्क, रुमाल बांधून रांगेत उभे होते. तर शहरात काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिकचे नियम पाळण्यात येत होते तर काही ठिकाणी हे नियम पादळी तुडवल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आपण केली असल्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.
एकाच लेन/रस्त्यावर अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर पाच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र ही पाच दुकाने निवडण्याचे निकष काय? यावरून वाद होण्याची शक्यता नाही का? किंवा ५ व्यतिरिक्त इतर दुकान चालकांवर अन्याय झाल्याची भावना का होणार नाही?
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
कोरोनासंदर्भात लढा देताना गेली दीड महिना मी स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर आहे. त्यामुळे संक्रमणाच्या या टप्प्यावर इतका वाढीव वेळ आणि सवलती देणे पुणेकरांना परवडणारे नाही. किंबहुना मोठ्या धोक्याला हे निमंत्रण देण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २ इतकी असावी, ही माझी मागणी सर्व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी, ही समस्त पुणेकरांच्या वतीने विनंती !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्री श्री. @AjitPawarSpeaks दादा यांच्याशीही माझे बोलणे झाले असून त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण अपेक्षा करूयात ते या प्रकरणी हस्तक्षेप करुन तातडीनं निर्णय घेतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020
नजीकच्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे, व्यवसाय सुरु करायचे आहेत, हे मीही मान्य करतो. पण याचा अर्थ असा नाही की अत्यंत घाईघाईने निर्णय घ्यायचा आणि सव्वा महिना प्रभावीपणे राबवलेल्या लॉकडाऊनवर पाणी फिरवायचं?#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 4, 2020