Lockdown in Maharashtra : कडक निर्बंधाबाबत संभ्रमात आहात ? मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अन् होईल शंकांचं समाधान, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू केली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही नवी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत काही नवीन निर्बंध राज्य सरकारने लागू केले आहेत. मात्र, अद्यापही नागरिकांमध्ये या नियमांबाबत काही संभ्रम आहे. यासाठीच राज्य सरकारने तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

प्रश्न – महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ?

उत्तर – ब्रेक दि चेनच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करु नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करुन एका ठिकाणाहून / स्थानकाहून दुसरी जाऊ शकता.

प्रश्न – घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का ? रेल्वे, बसने प्रवास करु शकतात का ?
उत्तर – प्रत्येक शहरांमध्ये संसर्गाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे या संदर्भात स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे.

प्रश्न – वाई शॉप आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का ?
उत्तर – नाही, केवेळ आवश्यक गटातीलच दुकाने सुरु राहतील

प्रश्न – मूव्हर्स अॅड पॅकर्सच्या मदतीने घरसामान हलवू शकतात का ?
उत्तर – अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि स्थानिक प्रशासनाने याला परवानगी दिली तर. मात्र, सर्वसामान्यरित्या याचे उत्तर नाही असेच आहे.

प्रश्न – लोकांना सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करु शकतात का ?
उत्तर – नाही

प्रश्न – सर्व सामान्य नागरिक लोकलने प्रवास करु शकतील का ?
उत्तर – होय. आदेशात दिलेल्या वैध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल रेल्वेचा उपयोग करु शकतील.

प्रश्न- खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी ये जा करु शकतील ?
उत्तर – त्यांची कार्यालये किंवा आस्थापना आवश्यक गटात असतील किंवा त्यांना निर्बंधातून वगळण्यात आले असेल तेच प्रवास करु शकतात.

प्रश्न – बाहेर गावी जाणाऱ्या रेल्वेचे काय ?
उत्तर – आवश्यक सेवा असल्याने त्या सुरुच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करु शकेल.

प्रश्न प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय ?
उत्तर- स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरु ठेवता येणार नाही.

प्रश्न- सिमेंड, रेडी मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का ?
उत्तर – आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बंधकाम स्थळ सुरु ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने आण करता येईल. साहित्याची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरुन देता येईल. मात्र, कोणतेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

प्रश्न – कुरिअर सेवा सुरु राहील का ?
उत्तर – फक्त अत्यावश्यक कारणांसाठी कुरिअर सेवा सुरु राहू शकते

प्रश्न- आवश्यक इ-कॉमर्स म्हणजे नेमके काय ?
उत्तर – सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक गटात येतात, उदा. किराणा, औषध, अन्न पदार्थ इत्यादी इ-कॉमर्स मार्फत वितरित केले जाऊ शकतात.

प्रश्न – वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येईल ?
उत्तर – नाही

प्रश्न – 19 एप्रिल रोजी होणारी MBBS परीक्षा होणार का ?
उत्तर – परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल. मात्र, विद्यार्थ्यांना हॉल तिकीटाच्या आधारे ये-जा करता येईल. तसेच प्रौढ व्यक्ती बरोबर असेल तरी मान्यता दिली जाईल.

प्रश्न – स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने सुरु राहणार का ?
उत्तर – नाही

प्रश्न – डेंटिस्टचे दवाखाने सुरु राहतील का ?
उत्तर – होय

प्रश्न – प्लम्बर, सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुस्ती करणारे येऊ शकतात का ?
उत्तर – टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज याबाबतीत सेवा देणाऱ्या व्यक्ती ये जा करु शकतात. तसेच पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता, उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. त्यामुळे दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा अन्यथा या सवलतीवर देखील निर्बंध आणावे लागतील.

प्रश्न – ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरु राहतील का ? ट्रॅव्हल, पासपोर्ट व्हिसा सेवांचे काय ?
उत्तर – ट्रॅव्हल एजन्सीज दुकाने सुरु ठेवून काम करु शकणार नाहीत. परंतु इंटरनेट, ऑनलाइन काम करु शकतात. आपण एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे कि व्हिसा, पासपोर्ट सेवा, सर्व शासकीय सेतू केंद्रे हे शासनाचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे.

प्रश्न – आयातदार व निर्यातदार यांना परवानगी दिली आहे. मात्र या निर्यातदारांना कामासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा सेवा देणारे सुरु ठेऊ शकतील का ?
उत्तर – नाही, केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तूंचा साठा करुन ठेवावा लागेल. निर्यातीच्या बाबतीत अगोदरच तयार करुन ठेवलेल्या वस्तंची निर्यात करता येईल. निर्यात करणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत बोलायचे तर केवळ निर्यातीची जी पुरवठा ऑर्डर असेल त्या मर्यादेतच उत्पादन करता येईल. काही अडचण असल्यास उद्योग विभाग मार्गदर्शन करेल.

प्रश्न – आवश्यक सेवा व सुविधांना सुरु ठेवण्यासाठी सहाय्यभूत उद्योग सुरु राहू शकतील का ?
उत्तर – ‘essential for essential is essential’ म्हणजे आवश्यकसाठी आवश्यक ते आवश्यक हे तत्व आहे. तरी देखील काही संभ्रम असल्यास उद्योग विभागाचा निर्णय अंतिम राहील.

प्रश्न – कामाच्या ठिकाणाजवळ राहणारे कामगार आणि कर्मचारीच उद्योग-कंपनीत येऊ शकतात की, इतर भागातून व गावांतून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांना देखील परवानगी आहे ?

उत्तर – 13 एप्रील रोजी काढलेल्या आदेशात आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये जा करु शकता. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरु राहू शकतात.

प्रश्न – रस्त्यावरील खाद्यविक्रेते व्यवसाय सुरु ठेवू शकतील का ?
उत्तर – सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. (या प्रकारात होम डिलिव्हरी होत नाही)

प्रश्न – उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परत परवानग्या घ्याव्या लागतील की पूर्वीच्या परवानगी वैध असतील ?
उत्तर – उद्योगांना सुरु राहण्यासाठी 13 एप्रिल 2021 च्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे.

प्रश्न – आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी त्या व्यक्तीस रॅपिड अँटीजेन चाचणी करावी लागेल का ?
उत्तर – नाही

प्रश्न – काही आवश्यक वस्तू जसे की अन्न पदार्थ हे उपहारगृहामार्फत किंवा कॉमर्समार्फत रात्री 8 नंतर घरपोच वितरित करता येतील का ?
उत्तर – 13 एप्रिलच्या आदेशान्वये आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरविणाऱ्या अस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री 8 नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेऊ शकते.

प्रश्न – पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन, एलपीजी बॉटलिंग प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का ?
उत्तर – होय

प्रश्न – मोठ्या गृहनिर्माण संस्थेत संपूर्ण सोसयटी मायक्रो कंटेनमेंट जाही केली जाऊ शकते का ?
उत्तर – सोसायटीच्या परिसरात 5 पेक्षा अधिक व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करावे लागते. जर गृहनिर्माण संस्था खूप मोठी असेल तर स्थानिक प्रशासन याबाबतीत रुग्णांचे अंशत: विलगीकरण क्षेत्र करण्याबाबतीत नियोजन करु शकते. कंटेनमेंट घोषित करण्यामागचा मूळ उद्देश या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि बाहेर जणाऱ्यांपर्यंत नियंत्रण आणणे आणि संसर्ग पसरणार नाही यासाठी तो भाग वेगळा करणे.

प्रश्न – आवश्यक सेवा ही फक्त सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीतच सुरु राहतील का ?
उत्तर – आवश्यक सेवा आठवड्याचे 24 तास सुरु राहील. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यात यासंदर्भात काही निर्बंध नाहीत.

प्रश्न – औषधी उत्पादनांची यंत्रसामुग्री आणि उपकरणे यांच्या उद्योगांना मान्यता आहे का ?
उत्तर – होय

प्रश्न – स्थानिक प्रशासन दुसऱ्या कोणत्या मुद्यावर नव्याने आदेश निर्गमित करु शकतील ?
उत्तर – स्थानिक प्रशासन अपवादात्मक म्हणून काही सेवा आवश्यक गटात अंतर्भूत करुन परवानगी देऊ शकतील. मात्र यासाठी त्यांनी संपूर्ण विचारांती आणि अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घ्यावयाचा आहे. स्थानिक प्रशासनास त्यांना गरज वाटली तर संसर्ग झपाट्याने पसरविणारे काही स्थळे व ठिकाणे बंद करण्याचा अधिकार असेल. उपहारगृहे आणि बार साठी स्थानिक प्रशासन वेळा ठरवेल आणि कोविड संसर्ग लक्षात घेऊन सुधारितही करु शकतील. लोकांच्या सोयीसाठी ते वेळा वाढवू देखील शकतील. मात्र, कुठलेही असे आदेस निर्गमित करण्यापूर्वी राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक आहे.