कायम राहणार ‘Lockdown’ ! राज्यात टप्प्याटप्प्याने शिथीलता, CM ठाकरेंनी दिले संबंधित विभागास ‘हे’ निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. त्यामुळे आता 1 जून पासून लॉकडाऊन शिथिल करणार की वाढवणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. सरकट लॉकडाऊन न उठवता हळूहळू टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवावा, असे मत अनेक मंत्र्यांनी मांडले. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.

राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढ वेगाने होत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. परंतु आपल्याला अजून काळजी घेणे आवश्यक आहे, असे मंत्रिमंडळाचे मत आहे. 1 जून नंतरही लॉकडाऊन वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात यावी. प्रथम आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्यात यावेत, अशी देखील मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला लगेचच निर्देश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन कायम राहणार

मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी माहिती मिळाली आहे ते पाहता लॉकडाऊन 1 जूनंतरही कायम राहणार हे निश्चित झाले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जाणार हे देखील स्पष्ट असून नेमकी कोणती मुभा मिळणार आणि कधीपासून मिळणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. यासंदर्भात 30 किंवा 31 मे च्या आसपास नवा आदेश जारी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध 1 जूननंतरही लागू राहणार का, नवा आदेश किती दिवसांसाठी असेल ? जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रेड झोन वगळता उर्वरित भागात हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होणार का, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. सध्या मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. त्यामुळे निर्बंध शिथील झाल्यास या भागातील नागरिकंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.