‘रेस्टॉरंट्स’ आणि ‘हॉटेल’ 15 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील ? प्रसार भारतीनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना विषाणूचे वाढते संकट पाहता सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु राज्यांत वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन पुढे वाढविण्याच्या बातम्या वेगाने येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. लॉकडाऊनबाबत सोशल मीडियावरही अनेक अफवा पसरल्या आहेत. सरकार त्यांना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
अशीच एक बातमी सध्या प्रचलित आहे की पर्यटन मंत्रालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद ठेवण्यास सांगितले आहे. या बातमीबद्दल प्रसार भारती यांनी स्पष्टीकरण दिले आहे की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.
फक्त होम डिलिव्हरी चालू आहे
या बातमीत 15 ऑक्टोबरपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्यात यावीत, असे सांगण्यात आले आहे. असे म्हटले आहे की लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अतिथींसाठीच हे खुले असेल. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद केली गेली आहेत, फक्त होम डिलिव्हरी चालू आहे कारण ते अत्यावश्यक सेवांच्या यादीमध्ये आहेत.
Reports claiming that hotels & restaurants will remain closed till Oct 15 owing to #COVID19 outbreak’ are wrong. The order circulating in social media in this regard is FAKE and has not been issued by the Tourism Ministry.
Govt has termed these reports as FAKE.
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) April 8, 2020
प्रसार भारती ने ट्विट केले आहे, 15 ऑक्टोबरपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. यासंदर्भात सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या फेक आहेत, अशी कोणतीही खबर पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली नाही. आतापर्यंत देशात सुमारे 6000 संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत, तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या 184 वर पोहोचली आहे. आज गुजरातमध्ये 55 आणि कर्नाटकात 10 नवीन प्रकरणे आढळली आहेत. संसर्ग झालेल्यांमध्ये 71 विदेशी नागरिकही आहेत.