मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर मला बारामतीत थांबूच दिले नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे. हैद्राबाद येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. दरम्यान, हैद्राबात येथील आयोजित पत्रकार परिषदेत बारामती लोकसभा मतदार संघाचा प्रचार संपल्यानंतर भाजपकडून मी बारामती मतदारसंघात थांबू नये अशी तक्रार निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. परंतु बारामतीमध्ये माझे घर, शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही. असे शरद पवार यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, माझे मतदान मुंबईत आहे, हे सर्वांना माहीत आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून मतदार प्रक्रियेवर परिणाम करण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते. असेही त्यांनी म्हंटले.
प्रचार संपल्यानंतर मी #बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. पण बारामतीमध्ये माझे घर आहे, शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही. माझे मतदान मुंबईत आहे, हे सर्वांना माहीत आहे. pic.twitter.com/o3MtY4zgMp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 23, 2019
मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण #EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा #EVMs मध्ये गडबड केली जाऊ शकते.#LokSabhaElections2019 pic.twitter.com/norhSubjTl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 23, 2019