काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवज्योतसिंग सिद्धू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या केवळ २ टप्प्यामधील मतदान आता बाकी आहे. येत्या १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांवर जोरदार टीका टिप्पणी केल्या जात आहेत. आशातच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘काळया इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला आहे. इंदौर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले सिद्धू ?
यावेळी बोलताना सिद्धू म्हणाले, “काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे”, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.

मोदी आंबांनींच्या दाराचे चौकीदार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार म्हणतात. मात्र, चौकीदार गरिबांचे दार सोडून अंबानींच्या दारासमोर उभा राहतो. काँग्रेसने आतापर्यंत देशाला ५ गांधी दिले. भाजपने मात्र, नीरव मोदी, ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी असे भगोडे लोक दिले असल्याचे सिद्धू म्हणाले.