चंद्रकांत पाटील म्हणाले की , ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखविले आहे. त्यामुळे खोटे बोलून मते मिळणार नाहीत , हे समजल्यामुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे . सुप्रिया सुळे लढतील मात्र त्या पडतील …!
देशाच्या विकास कामांविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की , ‘२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तोपर्यंत जनतेला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे.’ रस्तेबांधणी, मेट्रो व बुलेट ट्रेनबरोबरच अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करून कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच शेतीमजुरीचा कामाचा रोजगार हमीच्या कामात समावेश करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
माढा, बारामतीसह सर्वच जागा जिंकू –