लोकसभा २०१९ : ‘हा’ पक्ष असेल भाजपचा नवीन मित्रपक्ष 

चेन्नई : वृत्तसंस्था
केंद्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप आतापासूनच नियोजन आखत आहे. दक्षिणेत जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यामुळे अण्णा द्रमुक पक्षाकडून भाजपला दक्षिणेत पाठिंबा मिळणार का या विषयी चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e5196f4-cb92-11e8-9514-b7bef0eb73b2′]
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दिवंगत सी.एन. अन्नादुराई व जयललिता यांना भारतरत्न आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला दिवंगत एम.जी. रामचंद्रन, यांचे नाव देण्याची मागणी पलानीस्वामी यांनी केली. तसेच आगामी २०१९  च्या निवडणुकांसाठी भाजपला साथ देणार का ? या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केले. त्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दशकात देशातील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडूतील ‘द्रमुक’ किंवा ‘अण्णा द्रमुक’ यांचा प्रभाव सातत्याने दिसून आलेला आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रुमक पक्ष सत्तेवर आहे तसेच पक्षाचे ३७ खासदार असल्याने तो तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
[amazon_link asins=’B00PQKR85E,B00VT8CUHS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8626508-cb92-11e8-9ef6-3f680a9e608c’]
 त्यातच, पलानीस्वामी यांनी मोदींची भेट घेतल्यामुळे या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच, आपण भाजपसोबत आघाडीचा निर्णय घेऊ, असे सूचक विधान एआयएडीएमकेचे नेते आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केलं. त्यामुळे दक्षिण भारतात भाजपला नवीन मित्रपक्ष मिळण्याची शक्यता असून तसे झाल्यास दक्षिणेत भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतील राजकारणात अनेक घडामोडी घडणार असल्याचे दिसून येत आहे . दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली होती. तर, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती
तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनीही तामिळनाडूच्या राजकारणात एंट्री केली आहे. ‘मक्कल निधी मय्यम’ नावाचा पक्ष स्थापन करुन कमल हसन यांनी काढला आहे . तामिळनाडूमध्ये भाजपकडे केवळ एकच लोकसभेचीजागा आहे त्यामुळे दक्षिण भारतात आपले हात मजबूत करण्यासाठी भाजप कडून दक्षिणेत नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपने हात दिल्यानंतर कोण साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे