देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढे सोपे आहे का ? : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढे सोपे आहे का ? असे म्हणत पंकजा मुंडेवर धनंजय मुंडे यांनी हल्ला चढवला. यावेळी सरकारवर टीका करताना, बहुतेक मोदी साहेबांना विस्मरणाचा रोग निर्माण झाला असावा ? प्रचारानिमित्त महाराष्ट्रात येतात तेव्हा पवार साहेबांवरच टीका करतात आणि निवडणूक संपली की मोदींना पवार साहेबांची करंगळी आठवते असे मुंडे म्हणाले.

देशात २०१४ साली मोदी लाट होती. मात्र २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीचे वादळ आहे. यात कमळाच्या पाकळ्या राहणार नाहीत. महाराष्ट्रात पाण्याच्या दुष्काळापेक्षा मोदी दुष्काळामुळे मोठे चटके बसले आहेत. देशाची लोकशाही धोक्यात आहेत पण आता तसे होणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी मोदींवर टीका केली.

काल पंकजा मुंडेंनी घटना बदलायची आहे. त्यामुळे खासदार म्हणून निवडून द्या असे आव्हान केले त्या पंकजा मुंडेंना घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही’ असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.