पालघरमध्ये शिवसेनेला धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यात आणि देशात महायुतीची घोडदौड सुरु असताना पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. चौथ्या फेरीअखेर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी ३ हजार हून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. जाधव यांना २५ हजार ८९५ मते मिळाली असून भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना २२ हजार ४०५ मते मिळाली आहेत.

बळीराम जाधव यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे.सहा महिन्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यावेळी भाजप व शिवसेनेतच लढत झाली होती. खासदार झाल्यानंतर ही जागा शिवसेनेला दिली असली तरी भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर गावित उभे राहिले होते.

बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे़ त्यामुळे राज्यात महायुतीने मुसंडी मारली असली तरी पालघरमध्ये मात्र शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे़