पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशभरात भाजपला मिळत असलेल्या प्रचंड यशानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ अशाप्रकारची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सबका साथ, सबका विकास हा भारतीय जनता पक्षाने दिलेला नारा आहे. त्या नाऱ्याच्या बेरजेसोबत सबका विश्वास जोडत त्यातून विजयी भारत असा निष्कर्ष मोदींनी काढला आहे. आम्ही केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे, असे नरेंद्र मोदींना सांगायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत.
सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
Together we grow.
Together we prosper.
Together we will build a strong and inclusive India.
India wins yet again! #VijayiBharat
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. अमित शहा म्हणाले आहेत की, हा परिणाम म्हणजे विरोधी पक्षांनी केलेल्या दुष्टप्रचार, असत्य, व्यक्तिगत आरोप आणि तथ्यहीन राजकारणाच्या विऱोधात भारताच्या जनतेला दिलेला संदेश आहे. भारताच्या जनतेने जातीवाद, परिवारवाद आणि तुष्टीकरण यांना उखडून टाकून विकास आणि राष्ट्रवादाला पसंती दिली आहे.
दरम्यान, एक्झिट पोलमधून व्यक्त केलेले अंदाज खरे होताना दिसत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारी निकालाच्या एक दिवस आधीच केली होती.
यह परिणाम विपक्ष द्वारा किये गये दुष्प्रचार, झूठ, व्यक्तिगत आक्षेप और आधारहीन राजनीति के विरुद्ध भारत का जनादेश है।
आज का जनादेश यह भी दिखाता है कि भारत की जनता ने देश से जातिवाद, परिवारवाद और तुष्टिकरण को पूरी तरह से उखाड़ फेंककर विकासवाद और राष्ट्रवाद को चुना है।
भारत को नमन।
— Amit Shah (@AmitShah) May 23, 2019