Video : लंडनमध्ये शेतकर्यांच्या समर्थनार्थातील आंदोलनात दिसला भारतविरोधी अजेंडा, खलिस्तानी झेंडे देखील फडकले
पोलिसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिल्ली सीमारेषेवर आद्यप चालूच आहे. याबाबत सरकारशी चर्चा करूनही हाती काहीच लागले नाही. शेवटी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, कृषी कायदा २०२० विरोधात भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठं आंदोलन करण्यात करण्यात आलं. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले.
#WATCH: ‘Khalistani’ flags at a protest opposite Indian High Commission, London. The protest was to be against Indian farm laws. https://t.co/YeOWlFwokj pic.twitter.com/Ez5GF3MxzA
— ANI (@ANI) December 6, 2020
भारतीय उच्चायोगाने दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी ४० वाहनांची परवानगी घेण्यात आली होती. परंतु, सुमारे ७०० वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. उच्चायोगाला याची माहिती होती की, लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली नव्हती. कोरोना महामारीदरम्यान भारतीय उच्चायोगासमोर ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. हा गंभीर प्रकार आहे.
#WATCH: London Police in full force giving protection to Indian High Commission while protestors raise anti-India slogans and some pro-farmer slogans. pic.twitter.com/AfFbZdhLbX
— ANI (@ANI) December 6, 2020
एएनआयच्या माहितीनुसार, दरम्यान, या मोठ्या आंदोलनाची ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची दखल घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी काही समाजकंटकांना ताब्यातही घेण्यात आले. या आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आले. शेतकऱ्यांच्या समर्थनाबरोबरच भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.
भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. विनापरवानगी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित कसे झाले यासह इतर पैलुंची चौकशीही केली जात आहे. या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे. ही गोष्टी स्पष्ट आहे की, हे विभाजनवादी आणि भारतविरोधी लोक होते. जे शेतकरी आंदोलनाआडून आपला भारतविरोधी अजेंडा पुढे नेऊ पाहत होते. कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरु असलेले आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. असं आंदोलनक कोण होते आणि त्यांची मागणी काय होती? यावर स्पष्टीकरण देताना उच्चायोगाने सांगितलं.