अतिवृष्टीमुळे शेतकरऱ्यांचा मुगपिकांच्या नुकासानीचे पंचनामे करावे- अविनाश अनेराये

नायगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  शेळगाव छत्री येथे गेल्या ८ दिवसापासून सतत पाऊस चालु आहे. काही पिकाकरीता जरी हा पाऊस समाधानकारक होत असला तरी देखील मात्र मुगासाठी हा पाऊस जास्त झाला असून त्यामुळे शेळगाव छत्री येथील मुगपिकांचे पुर्णपणे नुकसान झालेले आहे.

या सर्व मुग पिकांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत करावे ही अशी विनंती  महाराष्ट्र बसव परिषद जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश अनेराये यांनी ईमेल द्वारे निवेदन देऊन राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांना केले आहे.