वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित महिला आणि अविवाहित तरुण प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला आहे. राधा आढाव (वय-28) आणि सुरेश पवार (वय-24) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत राधा आढाव हिला दोन मुलं असून सुरेश हा अविवाहित आहे. दोघेजण 28 नोव्हेंबर रोजी घरातून पळून गेले होते. बुधवारी रात्री ते शिरपूरला घरी परत आले. त्याच रात्री त्या दोघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राधा ही जांब आढाव येथील रहिवासी असून मागिल महिन्यापासून शिरपूर येथे कुटुंबासह राहत होती. शेजारी राहणाऱ्या सुरेश पवार या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. या आगोदर हे दोघे दोनदा घरातून पळून गेले होते. त्यानंतर नातेवाईकांना दोघांना समजत दिली होती.
मुलांना सासऱ्याकडे सोडले.
मयत राधाने बुधवारी रात्री तिच्या दोन्ही मुलांना सासऱ्याकडे सोडले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजले तरी राधाने दार उघडले नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना शंका आल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेश आणि राधा हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली की, घातपात आहे, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या