गलफ्रेन्डनं दुसर्‍याशी ‘साखरपुडा’ केल्यानं प्रियकरानं लिहिलं ‘डायरेक्ट’ Facebook वर, तुटलं ‘नातं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्यपणे कोणतेही जोडपे नात्यात असेल तर ते लग्न करून आपल्या नात्याला नाव देत असतात. मात्र हे जर पूर्ण झाले नाही तर काही लोकांना हे सहन होत नाही. आणि आपले प्रेमप्रकरण ते सार्वजनिक करून दोघांनाही नुकसान करून घेतात. अशाचप्रकारची एका घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली असून या ठिकाणी या पत्रामुळे मुलीचे नाते तुटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील कन्नोजमध्ये आपल्या प्रेमिकेने दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केल्याने त्याने आपले प्रेमप्रकरणाचा किस्सा फेसबुकवर शेअर केल्याने त्या मुलीचे लग्न मोडले. हे प्रकरण पाहिल्यानंतर त्या मुलीचे ज्या युवकाशी लग्न ठरले होते, त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आता या मुलीने आपल्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून तिने या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत.

तिने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे कि, तिची या मुलाशी मैत्री झाली होती. मात्र त्यानंतर तिने त्याच्याशी सबंध संपवले. मात्र त्यानंतर देखील मुलगा तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे तिने अखेर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

Visit : Policenama.com