निखील भगवान हापसे (वय 21 रा. औद्योगिक वसाहत, श्रीरामपूर), ऐश्वर्या जगधने ही मयतांची नावे आहेत. मुलीच्या चेहर्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. मुलाच्याही मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या होत्या.
सदर प्रेमीयुगल शुक्रवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता झाले होते. श्रीरामपूर शहर पोलिस त्यांचा शोध घेत होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह श्रीरामपूर-पढेगाव रेल्वेमार्गावर आढळून आले. मयत मुलगी ही तालुक्यातील बेलापूर येथील एका महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होती. तर मुलगा औद्योगिक वसाहतमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण चर्चेत आले होते. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. परंतु या प्रकरणाला कुटुंबियाकडून होत असलेल्या विरोधामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.